हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील पर्यटनदृष्ट्या एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पश्चिम घाट व अरबी समुद्र या दरम्यान हा भूप्रदेश वसला असून वैविध्यपूर्ण जैवविविधता आणि स्वच्छ, सुंदर सागरकिनारे हे या जिल्ह्याचे प्रमुख आकर्षण आहे. साधारणपणे १२० किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेल्या या जिल्ह्याचा भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही लक्षणीय स्वरूपाचा आहे. प्राचीन काळातील अनेक महत्वाची मंदिरे, पुरातन गड – किल्ले व वास्तू त्याची साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला हा जिल्हा अनेक नररत्नांची खाण म्हणूनही ओळखला जातो.
अधिक माहिती.....